महाराष्ट्रात पावसाचे वातावरण पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.(forecast)अरबी समुद्रातील वारे शांत झाले असले तरी ओडिशा आणि पश्चिम बंगालमार्गे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलामुळे वाऱ्यांची दिशा विदर्भाकडे वळली असून पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. राज्यात कुठेही आज रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही, मात्र हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीखाली आल्याने दिलासा मिळाला असला तरी 50 रस्ते अद्याप बंद आहेत, तसेच 46 बंधारे पाण्याखाली आहेत. हवामानातील हा बदल येत्या काही दिवसांत पुन्हा अडचणी निर्माण करू शकतो.(forecast)विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे 152 पैकी तब्बल 105 पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यामध्ये जलसंपदा विभागाचे 37 आणि मृद व जलसंधारण विभागाचे 68 प्रकल्प आहेत. त्यामुळे जनावरांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबई आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (forecast)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

सरकारी वकिलाच्या आत्महत्येत ई-मेलचा धक्कादायक खुलासा….

लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू

शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *