बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत, त्यातलीच एक आहे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने आपल्या लग्नाचा (marriage)किस्सा शेअर करताना आमिर खानचे आभार मानले.

अक्षय म्हणाला की, त्याने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, मात्र ती तयार नव्हती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयला मजेत सांगितलं होतं – “माझा मेला चित्रपट फ्लॉप झाला, तर मी तुझ्याशी लग्न करेन.” त्या काळात सर्वांना वाटत होतं की मेला मोठा हिट ठरेल. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
ट्विंकलने आपला शब्द पाळत 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय कुमारसोबत लग्न(marriage) केलं. आजही ही जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते.

अक्षयने मजेत आमिर खानबद्दल बोलताना सांगितलं – “माफ कर आमिर भाई, तुझा चित्रपट चालला नाही. पण मी कायम तुझा आभारी आहे, कारण तुझ्यामुळेच मला ट्विंकल मिळाली.”
हेही वाचा :
जायफळाचे ‘हे’ उपाय केल्यास दूर होईल आर्थिक संकट
अधिकाऱ्याची महिला डॉक्टरकडे अश्लील मागणी; केबिनमध्ये बोलावलं अन्…
फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…Video Viral