बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पती बंगळुरु येथे नोकरीसाठी गेल्यानंतर पत्नी साक्षीने (नाव बदललेले) आपल्या जुन्या प्रियकर(Boyfriend) राहुलसोबत संबंध पुन्हा सुरू केले. सासू-सासरे तीर्थयात्रेला गेल्याचा फायदा घेत तिने राहुलला घरी बोलावलं आणि दोघे पाच दिवस एकत्र राहिले.मात्र सासू-सासरे अचानक घरी परतले तेव्हा त्यांनी सुनेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. ही घटना गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि अखेर पंचायत भरली.

पंचायतीत पती बिट्टूने सांगितले की, “जर तिचं मन राहुलकडे आहे, तर तिचं लग्न त्याच्याशी लावा.” त्यानंतर पंचायतीने सुनेचं आणि प्रियकराचं गावातच लग्न लावलं. दोघांकडून स्टॅम्प पेपरवर (Boyfriend)एकत्र राहण्याचं लेखी आश्वासन घेण्यात आलं.राहुलच्या कुटुंबाने साक्षीला आपल्या घरी नेलं, तर तिच्या माहेरच्यांनी या घटनेवर मौन बाळगलं आणि घटनास्थळी येण्यास नकार दिला. पोलिसांत या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
हेही वाचा :
साप आणि मांजर चक्क उंदरासाठी लढले, आणि पुढे काय झाले…Viral Video
धर्मेंद्र खरच हेमा मालिनींसोबत राहत नाहीत का? बॉबी देओलने प्रकरण स्पष्ट केले…
कपडे बदलताना आत शिरला, नंतर मुलीने….