पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणजे उत्साह, आनंद आणि देशभक्तीचा सोहळा. मात्र यंदा कराची शहरात हा दिवस आनंदाऐवजी रक्तपात आणि भीतीची आठवण ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात झालेल्या निष्काळजी हवाई गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाले. शहरातील अनेक भागांमध्ये या घटना घडल्या, ज्यामुळे आनंदाचा दिवस हळहळीत बदलला.अझीझाबाद परिसरात झालेल्या हवाई गोळीबारात एका तरुणीला गंभीर दुखापत झाली. कोरंगी भागात तर सणाच्या जल्लोषात (celebration)स्टीफन नावाच्या व्यक्तीचा जीव गेला.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, अशाच घटनांमध्ये किमान ६४ लोकांना गोळ्यांनी जखमी करण्यात आले. बचाव पथकांनी तातडीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.शहरातील बचाव आणि पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकारचा निषेध केला असून, त्याला “अत्यंत निष्काळजी, धोकादायक आणि मानवी जीवनाला धोका पोचवणारे कृत्य” असे म्हटले. पोलिसांनी नागरिकांना उत्सव साजरा (celebration)करताना सुरक्षितता पाळण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात सहभागी झालेल्यांवर कठोर कारवाई होईल, तसेच कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटू दिले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

कराचीमध्ये अशा घटनांचा इतिहास नवीन नाही. केवळ जानेवारी महिन्यातच झालेल्या विविध गोळीबारांमध्ये पाच महिलांसह किमान ४२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २३३ जण जखमी झाले होते. यात दरोडेखोरांशी चकमकी, वैयक्तिक वैमनस्य आणि उत्सवांदरम्यानचा हवाई गोळीबार या सर्व घटनांचा समावेश होता.याशिवाय, जानेवारीच्या सुरुवातीला कराचीमध्ये रस्ते अपघात, दरोडाविरोधी कारवाया आणि हवाई गोळीबारामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. केवळ एका महिन्यात ३६ जण रस्ते अपघातात मरण पावले, तर ५२८ नागरिक जखमी झाले. दरोड्याच्या प्रयत्नांना अडवताना तीन जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले.

कराचीतील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राष्ट्रीय सणाचा आनंद घेण्याचा अर्थ काय? स्वातंत्र्यदिनाच्या नावाखाली जर निष्काळजी हवाई गोळीबार केला जात असेल, ज्यात निरपराध नागरिकांचा जीव जातो, तर तो उत्सव आहे की विनाशाचा खेळ? तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या अनेक भागांत हवाई गोळीबार हा ‘उत्सव साजरा करण्याचा’ पारंपरिक प्रकार समजला जातो, मात्र यात होणारे अपघात आणि मृत्यू हे गंभीर सामाजिक समस्या बनले आहेत.

पोलिसांनी या सर्व घटनांची चौकशी सुरू केली असून, सहभागी असलेल्या सर्वांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि स्थानिकांच्या टिप्सवर आधारीत शोध मोहीम सुरू आहे. कराचीच्या रस्त्यांवर अजूनही भीतीचे सावट आहे. नागरिकांना भीती वाटते की, उत्सवाचे हे दिवस पुन्हा रक्तरंजित होऊ नयेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “देशभक्ती दाखवायची तर ती सुरक्षिततेच्या चौकटीत राहून दाखवा, कारण देशाच्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे नागरिकांचे सुरक्षित आणि सुखी जीवन.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी

खाद्य संस्कृती आणि स्वातंत्र्य दिन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *