लग्नाच्या पहिल्याच रात्री नव्या नात्याला तडा गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश (breaking down) मधील हमीरपुर जिल्हा येथे उघडकीस आली आहे. सुहागरातीनंतरच वधूने पतीसोबत नांदण्यास स्पष्ट नकार देत थेट पोलिस ठाणे गाठल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोहांड परिसरातील मिथिलेश कुमारी हिचा विवाह राठ येथील धरम सिंह याच्याशी पार पडला होता. सर्व विधी पार पडल्यानंतर वधू सासरी बुधौलियाना येथे पोहोचली. मात्र पहिल्याच रात्री तिने पतीला स्पष्ट शब्दांत सांगितले की ती हे लग्न मान्य नसून ती त्याच्यासोबत राहू शकत नाही. तिने आपल्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोप केला.

सकाळ होताच वधूने थेट राठ कोतवाली पोलिस ठाणे (breaking down) गाठले आणि आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रकाराची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि दोन्ही कुटुंबीय पोलिस ठाण्यात दाखल झाले. याठिकाणी मोठी खडाजंगी झाली तसेच पंचायतही बसवण्यात आली.
धरम सिंह याला या घटनेचा जबर धक्का बसला. लग्नापूर्वीच वधूने आपली भूमिका स्पष्ट केली असती तर हे टाळता आले असते, असे त्याने सांगितले. अचानक अशा प्रकारे नातं तुटल्याने आपली बदनामी झाल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
प्रकरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने (breaking down) अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने नाते संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वधू तिच्या नातेवाईकांसोबत माहेरी परतली. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून जबरदस्तीच्या विवाहांविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार