मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(date) बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व जलजोडणीधारकांना 31 मार्च 2026 पूर्वी थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास संबंधित घर किंवा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबईमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू असला तरी अनेक ग्राहकांकडे पाणीपट्टी थकीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी वेळेत बिल भरावे, अन्यथा नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने थकीत जलदेयक (date) वसुलीसाठी विशेष पावले उचलली आहेत. 31 मार्च 2026 पर्यंत प्रलंबित पाणीपट्टी भरली नाही तर संबंधित पाणी जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते. ही कारवाई मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 279 (1) (अ) अंतर्गत केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. म्हणूनच सर्व जलजोडणीधारकांनी वेळेत थकीत पाणी बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. अन्यथा नागरिकांना पाणीपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
नागरिकांना बिल भरणे सोपे व्हावे यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.(date) महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने पाणी बिल भरता येते. तसेच जवळच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जाऊनही जलदेयकाचा भरणा करता येणार आहे. याशिवाय एनईएफटी, ऑनलाइन पेमेंट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या नागरिकांना बिल प्राप्त झालेले नाही त्यांनी आपल्या संबंधित वॉर्ड कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?