डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.(payment) भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम जाहीर केले असून हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असताना फसवणूक आणि हॅकिंगच्या घटनाही वाढत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.आजकाल अनेकजण यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा डिजिटल वॉलेटद्वारे व्यवहार करतात. अनेक वेळा केवळ ओटीपी टाकून व्यवहार पूर्ण केला जातो. मात्र नवीन नियमांनुसार केवळ ओटीपी पुरेसा ठरणार नाही. आता प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी दोन स्तरांची पडताळणी आवश्यक असेल.

नवीन नियमांनुसार, प्रत्येक ऑनलाइन व्यवहारासाठी किमान दोन.(payment) वेगवेगळ्या पडताळणी पद्धतींचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये मोबाइल पिन, यूपीआय पिन, पासवर्ड, बायोमेट्रिक, फिंगरप्रिंट किंवा डायनॅमिक ओटीपी यांसारख्या पद्धतींचा समावेश असू शकतो. यापैकी किमान एक पद्धत डायनॅमिक असणे अनिवार्य असेल. तसेच व्यवहाराच्या रकमेप्रमाणे पडताळणीची पातळी ठरवली जाईल. लहान रकमेच्या नियमित व्यवहारांसाठी कमी पडताळणी लागू शकते, तर मोठ्या किंवा संशयास्पद व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाईल. या पद्धतीला रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशन असे म्हटले जाते.
आरबीआयच्या मते, देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .(payment)मात्र त्याच वेळी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि हॅकिंगच्या घटनाही वाढत आहेत. जुना एसएमएस ओटीपी अनेकदा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे, कारण हॅकर्स तो सहज मिळवू शकतात. नवीन नियमांमुळे फिशिंग, अनधिकृत व्यवहार आणि ऑनलाइन फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली आणि बँक किंवा पेमेंट कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन केले नसेल, तर ग्राहकाला नुकसान सहन करावे लागणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित बँकेला किंवा कंपनीला संपूर्ण रक्कम परत करावी लागेल.
या बदलांमुळे बँका तसेच पेटीएम, गूगल पे आणि फोनपे यांसारख्या .(payment)डिजिटल पेमेंट कंपन्यांना त्यांच्या प्रणाली अपडेट कराव्या लागतील. व्यवहारांवर अधिक लक्ष ठेवणे आणि नवीन सुरक्षा प्रणाली लागू करणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल. ग्राहकांनीही आपले बँक किंवा यूपीआय ॲप वेळोवेळी अपडेट ठेवावे. तसेच बायोमेट्रिक सुविधा सक्रिय करणे, पिन किंवा ओटीपी कोणालाही न सांगणे आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व उपायांमुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक