सध्या प्रत्येकाची जीवनशैली इतकी आपल्याला स्वतःसाठीही वेळ नसतो.(insufficient)यामध्ये आपण सातत्याने दुर्लक्षित करतो ती समस्या म्हणजे अपुरी झोप. मोबाईलचा वाढता वापर, कामाचा ताण आणि उशिरापर्यंत जागरण या सगळ्यामुळे अनेकजण पुरेशा प्रमाणात झोप घेत नाही. मात्र याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते दिसून येत नाहीत तर शरीर आणि मेंदूवरही याचे परिणाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आकाश हेल्थकेअर मधील डायरेक्टर आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर भारद्वाज यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अपुऱ्या झोपेचे काय परिणाम होतात याबाबत त्यांनी माहिती दिलीये.

मेंदूवर थेट परिणाम
झोपेची कमतरतेचा सर्वात पहिला परिणाम हा तु्मच्या मेंदूवर (insufficient)परिणाम करतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुरेशी झोप न घेतल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची ताकदही कमी होते.
मूडवर होतो परिणाम
झोप कमी झाली की, त्याचा परिणाम थेट तुमच्या मूडवर दिसून येतो. अशावेळी व्यक्ती चिडचिड करते आणि ताणतणावात वाढ होते. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास डिप्रेशनचाही धोका वाढू शकतो.
इम्यून सिस्टम कमजोर होण्याची शक्यता
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा त्रास होतो. झोपेतच शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. मात्र झोप अपुरी राहिल्यास ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडत नाही आणि त्यामुळे इम्यून सिस्टम नीट काम करू शकत नाही.
वजन वाढण्याचा धोका
पुरेशा प्रमाणात झोप झाली नाही की शरीराच्या मेटाबॉलिझमवरही परिणाम होत असतो. यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स अधिक एक्टिव्ह होतात. अशावेळी जास्त खाण्याची सवय लागू शकते. परिणामी वजन वाढण्याचा धोका असतो.
हृदयाच्या आरोग्यावरही होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो. अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अपुरी झोप घेऊ नये.
किती तासांची झोप आवश्यक?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ७ ते ८ तासांची (insufficient)झोप घेणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना यापेक्षा जास्त झोप आवश्यक असते. याशिवाय झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवणं, झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहणं.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी