महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (scheme) राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देणारी ही योजना सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली होती. मात्र, कालांतराने अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया सक्तीची केली. या पार्श्वभूमीवर सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निश्चित केली होती. त्यानंतरही काही महिलांना संधी देण्यासाठी मुदत दोन वेळा वाढवण्यात आली. आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत दुरुस्तीची अंतिम संधी देण्यात आली असून, यानंतर निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

सरकारी माहितीनुसार, (scheme) ई-केवायसीनंतर सुमारे ७० ते ८० लाख महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते खात्यात न आल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपण पात्र असूनही पैसे का आले नाहीत, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ पासून ज्या महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होणार नाही, त्या महिलांना अपात्र समजले जाईल. त्यामुळे या योजनेचा लाभ पुढे सुरू राहणार की नाही, याबाबत स्पष्टता मिळणार आहे.
लाभार्थींनी आपली स्थिती तपासण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर (scheme) लॉगिन करून अर्जाची स्थिती किंवा लाभार्थी यादी तपासणे आवश्यक आहे. आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर आपले नाव यादीत आहे की नाही, हे समजू शकते. या सर्व प्रक्रियेमुळे पात्र महिलांना योग्य लाभ मिळावा आणि गैरव्यवहार रोखावा, हा सरकारचा उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून आपली पात्रता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!