अयोध्येत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य श्री राम जन्मभूमी मंदिरच्या (temple)शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ फूट लांब, ११ फूट रुंद आणि सुमारे ३ किलो वजनाचा धर्मध्वज फडकवला. ध्वजारोहण सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि देशभरातून आलेले सुमारे ७००० पाहुणे उपस्थित होते. ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधानांनी सप्तमंदिरात सप्त ऋषींचे दर्शन घेतले आणि भगवान रामाची आरती केली.

पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी म्हटले की, “हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही, तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा प्रतीक आहे. शतकानुशतके जुन्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप, संतांच्या आध्यात्मिक साधना आणि समाजाच्या सहभागाचे प्रतिक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “हा क्षण शतकांचे दुःख संपवणारा, संकल्प पूर्ण करणारा आणि ५०० वर्षे जळत असलेल्या यज्ञाची पूर्तता दर्शवतो.”पंतप्रधानांनी या सोहळ्यात राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या सर्व परोपकारी, कामगार, नियोजक आणि वास्तुविशारदांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, मंदिराचे (temple)दिव्य अंगण आणि सप्त मंदिर लोकांमध्ये मैत्री, कर्तव्य, सामाजिक सौहार्द आणि रामभक्तीची जाणीव निर्माण करतात.

मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग सक्षम होईल, तेव्हा संकल्प साध्य होईल. राम मंदिर आणि धर्मध्वज आपल्याला वारशाचा अभिमान, संस्कृतीची जाणीव आणि मानसिक गुलामगिरीपासून मुक्त होण्याची प्रेरणा देतात. मॅकॉलेच्या मानसिक गुलामगिरीच्या पद्धतीपासून मुक्त होणे ही आपल्या भविष्याची जबाबदारी आहे.”२५ नोव्हेंबरचा हा दिवस भारतीय इतिहासात अभिमानाचे आणि संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे प्रतीक ठरला आहे, ज्याने देशभरातील रामभक्तांच्या मनात उत्साह आणि श्रद्धेची नवी लहर निर्माण केली आहे.

हेही वाचा :

‘त्याच्या जाण्याने…’, रात्रभर वीरूच्या आठवणीत जय अस्वस्थ! 2.25 AM ला अमिताभ म्हणाले

स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट…

इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *