आज सकाळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली. (Deputy) या बातमीनंतर काही वेळानेच अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्याची माहिती आहे. दादा गेले हे कळताच बारामतीकर हळहळले. आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय.राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे नाव सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत होतं. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं काम, धडाडी, एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीचं पाहिलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने पवार कुटुंबियांसह संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला आहे.

अजित पवार यांनी १९९१ साली प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली होती.(Deputy) यावेळी ते बारामतीचे खासदार झाले. त्याच वर्षी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर केंद्रात बदल करण्यात आले. त्यावेळी राष्ट्र शरद पवार संरक्षण मंत्री झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून ते सातत्याने बारामतीतून विजयी होत आहेत.अजित पवार १९९१ साली पहिल्यांदा मंत्री झाले. १९९५ ते १९९९, २०१४ ते २०१९ आणि २०२२ ते २०२३ हा कालावधी सोडला तर बाकीच्या काळात त्यांच्याकडे मंत्रीपद होतं. गेल्या तीन दशकांत इतका मोठा काळ मंत्रिपद भूषवणारे ते राज्यातील एकमेव नेते मानले जातात.
त्यांनी अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, ग्रामविकास मंत्री अशा महत्त्वाच्या (Deputy)खात्यांचा कारभार पाहिला आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर ते एक वर्ष विरोधी पक्षनेते होते.जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर तब्बल ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. याशिवाय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारासाठीही त्यांना जबाबदार धरलं गेलं.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली