दिवंगत अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्याचा सशंय आमदार रोहित पवार (box) सातत्याने करत आहेत. त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेत सादरीकरण केले आहेत. त्यात VSR कंपनी, या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि AAIB आणि इतर तपास यंत्रणांच्या संथ तपासावर त्यांनी सडकून टीका केली. ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी आहेत. त् ॲरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये ॲरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे, अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तर आतापर्यंत ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा करण्यात येत होता. तर आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर अजितदादांच्या अपघातातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? असा रोकडा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

“अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी (box) उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत.अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही…

VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या (box) लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!” अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे .ष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी राज्यसभेत अजितदादांच्या विमान अपघाताविषयी प्रश्न विचारले. त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तर दिलं. एअर एव्हिएशन इनव्हेस्टीगेशन ब्यूरोकडून तपास सुरू आहे. AAIB दादांच्या विमान अपघाताप्रकरणी सखोल आणि पारदर्शक तपास करत आहे, असे नायडू यांनी सांगितले. तर तपास कसा व्हावा हे भारत सरकार ठरवत नाही. तर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल ठरवते आणि त्यानुसारच पुढील तपास सुरू आहे . जगात कुठेही अपघात झाला तरी याच प्रकारे तपास होतो. यापूर्वी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जायचा. पण आता ब्लॅक बॉक्स इथेच एएआयबी लॅबमध्ये डीकोड होत असल्याचा दावा त्यांनी केला. तर देशातच तपास होण्यासाठीची व्यवस्था तयार होत असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणाले.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *