कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज हवामानात अचानक (rains) बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक आकाश काळ्या ढगांनी व्यापून आले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी पावसासोबत मोठी गारपीट झाल्याने रस्त्यांवर गारांचा पांढरा शुभ्र थर साचल्याचे पाहायला मिळाले. या अवकाळी संकटामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली असून उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना जरी थंडावा मिळाला असला,(rains) तरी या पावसामुळे शेतीचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड होता की,(rains) अवघ्या तासाभरात सखल भागांमध्ये पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या गारांमुळे द्राक्ष, आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका बसला असून काढणीला आलेली पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून काही भागांतील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक