ही राजस्थानची मलाई प्याज़ भाजी एकदा करून बघा,(rajasthani) नक्कीच तुमच्या जेवणात राजेशाही चव आणेल. कांदा, दही आणि निवडक मसाल्यांपासून बनवलेली ही सोपी, झटपट आणि मसालेदार रेसिपी जेवणाची चव आणखीनच वाढवते.

राजस्थानची ओळख फक्त किल्ले, राजवाडे आणि वाळवंटापुरती मर्यादित नाही, तर तेथील खाद्यसंस्कृतीसुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. राजस्थानी जेवण म्हटलं की आपल्याला लगेच(rajasthani) दाल-बाटी-चूरमा, गट्टे की सब्जी, कढी यांची आठवण येते. पण या पारंपरिक पदार्थांबरोबरच काही अनोख्या आणि हटके रेसिपी सुद्धा राजस्थानच्या खानपानात दिसतात. त्यातीलच एक खास आणि चविष्ट डिश म्हणजे मलाई प्याज़.
या डिशमध्ये कांद्याचा गोडसरपणा, मसाल्यांचा तिखटपणा आणि मलाईची गोडसर मखमली चव एकत्र येऊन अतिशय अप्रतिम असा स्वाद तयार होतो. ही भाजी साधी असली तरी तिची चव रेस्टॉरंट स्टाईल डिशेसना स्पर्धा देते. खास करून जेव्हा घरात काही पाहुणे येतात किंवा दुपारच्या/रात्रीच्या जेवणाला थोडं वेगळं बनवायचं असतं, तेव्हा मलाई प्याज़ हा उत्तम पर्याय ठरतो. राजस्थानमध्ये कांदा हा जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. उष्ण हवामानात कांद्याचे सेवन शरीराला थंडावा देतं, त्यामुळे कांद्याचे विविध पदार्थ तिथे लोकप्रिय आहेत. मलाई प्याज़ ही डिश साध्या साहित्याने बनते, पण तिचा राजेशाही स्वाद जीभेला चवदार अनुभव देतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कांदे – २ मोठे
तेल / तूप – २ टेबलस्पून
जिरे – १ टीस्पून
आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
हिरवी मिरची – २
लाल तिखट – १ टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
धणेपूड – १ टीस्पून
जिरेपूड – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कसुरी मेथी – १ टीस्पून
मलाई (फ्रेश क्रीम) – ½ कप
कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती
यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम कढईत तेल/तूप गरम करून त्यात जिरे टाकून फोडणी करून घ्या.
त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून सुवास येईपर्यंत परतून घ्या.
आता बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घालून नीट मिसळा.
गॅस मंद आचेवर ठेवून त्यात मलाई घालून हलक्या हाताने ढवळा.
वरून कसुरी मेथी चुरून टाकल्यास अप्रतिम सुगंध आणि चव येते.
शेवटी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम मलाई प्याज़ चपाती, फुलका किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
हवे असल्यास कांद्याऐवजी शलोट्स वापरले तरी चवदार लागतात.
मलाई ऐवजी दुधाची साय वापरली तरी चालते.
ही डिश तिखटसर खाल्ली तर अधिक स्वादिष्ट लागते.
हेही वाचा :
‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?