दिवाळीच्या (Diwali)पार्श्वभूमीवर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा नेते राहुल रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध मंडळांनी अत्यंत कल्पकतेने व आकर्षक सजावटीने आपले किल्ले साकारले.या स्पर्धेत भाग घेण्याचे जय हनुमान गणेशोत्सव मंडळाचे हे पहिलेच वर्ष होते, त्यांनी सादर केलेल्या किल्ल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्यांच्या किल्ल्यात ऐतिहासिक घटकांसोबत दिवाळीचा (Diwali)उत्साह, प्रकाशाची सजावट आणि पर्यावरणपूरक साहित्याचा सुंदर वापर करण्यात आला होता. परीक्षकांनी सर्जनशीलता, बांधणीतील अचूकता आणि विषय सादरीकरण या निकषांवर मूल्यांकन केले.

या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मंडळाचे पदाधिकारी म्हणाले, “हा सन्मान आमच्या सर्व सदस्यांच्या एकत्रित परिश्रमाचे फलित आहे. पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहाने आणि नवीन कल्पनांसह सहभागी होऊ.”
✨ मन:पूर्वक अभिनंदन! ✨

हेही वाचा :

भारताच्या विजयावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया…

Whatsapp चं नवं फीचर! आता चॅट बॅकअपसह प्रायव्हेट मेसेज अन् व्हिडिओ राहणार सुरक्षित

गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *