सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेतून(employees)दिलासादायक माहिती समोर आली आहे. पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना शक्यतो एकाच शहरात किंवा एकाच मुख्यालयात पोस्टिंग देण्याच्या धोरणाला केंद्र सरकारने पाठिंबा दिला आहे. नोकरीच्या कारणामुळे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरांत किंवा राज्यांत राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने कौटुंबिक स्थैर्य आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य यांना प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.राज्यसभेत खासदार प्रा. मनोज कुमार झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की पती-पत्नी दोघेही केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असतील तर त्यांना एकाच ठिकाणी किंवा जवळच्या ठिकाणी नियुक्ती देण्याचा प्रयत्न केला जाईल.

यासाठी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने सर्व मंत्रालये (employees)आणि विभागांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रशासकीय गरज, रिक्त पदे आणि कामकाजाची कार्यक्षमता लक्षात घेऊन प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.या धोरणाचा लाभ बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही होणार असून, वित्तीय सेवा विभागाने यासाठी स्वतंत्र ट्रान्सफर पॉलिसी जाहीर केली आहे. जोडीदार सरकारी सेवेत असल्यास बँक कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी पोस्टिंग देण्यावर भर दिला जाणार आहे.

महिलांच्या बदल्यांमध्ये घराजवळील किंवा सोयीच्या ठिकाणाला प्राधान्य देण्यात येणार असून,(employees) कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पसंतीचे ठिकाण नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. बदलीविषयक तक्रारींचा निपटारा १५ दिवसांत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनात स्थैर्य येईल, मानसिक तणाव कमी होईल आणि कामातील समाधान वाढेल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे हा निर्णय लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल