बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (children) यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेसाठी अजित पवार आज ता.२८ विमानाने बारामतीत दाखल झाले होते.मात्र, विमानतळावर उतरतानाच झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरात शोककळा पसरली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांना या घटनेचा मोठा धक्का बसला असून (children), दुःख अनावर झाल्याने ते अक्षरशः ढसाढसा रडले. अश्रूंना वाट मोकळी करून देताना मुश्रीफ म्हणाले, “अतिशय शिस्तप्रिय आणि कणखर नेता आज आपल्यातून गेला. ज्यांच्या आधारावर आम्ही राजकारण करत होतो, असे नेतृत्व हरपले. आम्ही आता पोरके झालो आहोत.”, अशी त्यांनी भावना व्यक्त केलीये.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार (children)संजय राऊत यांनीही अजित पवारांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. “अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची कार्यपद्धती आणि प्रशासनावरची मजबूत पकड ही महाराष्ट्राच्या स्मरणात कायम राहील,” असे राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा :
कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा
महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली