स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. असं असतानाच राज यांना सोबत घेताना इंडिया आघाडीमध्ये कायम राहायचं आणि राज ठाकरेंनाच महाविकास आघाडीत घ्यायचं की बंधूप्रेमासाठी इंडिया आघाडीतून बाहेर पडून राज यांच्यासोबत युती करुन लढायचं यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचा संभ्रम कायम आहे. सामोपचाराने सर्वांना एकत्र घेऊन महाविकास आघाडीची राज ठाकरेंचा समावेश करुन मोट बांधण्याचा ठाकरेंच्या सेनेचा आणि खास करुन प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. एकीकडे ते काँग्रेसच्या(Congress) संपर्कात असून दुसरीकडे ते राज ठाकरेंशीही चर्चा करत आहेत. मात्र आता यावरुन भाजपाने राऊतांवर निशाणा साधला आहे.

इंडिया आघाडी पक्षात नसलेले लोकउद्या शिष्टमंडळाचा भाग असल्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात तसेच राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. काँग्रेससोबतच्या ज्या बैठका सुरु आहेत त्यामध्ये राज ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात चर्चा होत असल्याचं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. “राज ठाकरेंच्या युतीसंदर्भातील निर्णयावर आम्ही चर्चा करत आहोत. कालसुद्धा वेणू गोपाल यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. राहुलजी आणि खर्गे यांच्याशी देखील चर्चा करु. उद्याचं जे शिष्टमंडळ आहे ते राजकीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन सकपाळ यांनी समजून घेतलं पाहिजे. हा विषय एका पक्षाचा नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना भेटत आहोत. निवेदन देऊन आम्ही चर्चा करणार आहोत, उद्या दुपारी दीड वाजता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत,” असं राऊतांनी सांगितलं. “शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, राज ठाकरे, कॉम्रेड अजित नवले अशा सर्वांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि ते सर्व येत आहेत,” असंही राऊत म्हणाले. “हर्षवर्धन सकपाळ यांचा जो मुद्दा आहे की इंडिया आघाडी पक्षात नसलेले लोक त्यात आहेत. इथे इंडिया आघाडी पक्ष किंवा महाविकास आघाडी हा विषय नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर घटक पक्षांना देखील निमंत्रण दिल आहे, यात कोणी राजकारण आणू नये,” असा सल्ला राऊतांनी दिला.

“काँग्रेसच नेतृत्व दिल्लीत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घ्यायचा कोणताही अधिकार नाही. जसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे इथे निर्णय घेऊ शकत नाही, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत, काँग्रेसही तसंच आहे,” असा टोला राऊतांना हर्षवर्धन यांचा थेट उल्लेख न करता लगावला.राज ठाकरे आणि काँग्रेस असा दोघांना सोबत घेण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रयत्नावरुन भाजपाने निशाणा साधला आहे. “काँग्रेसकडून(Congress) सुपारी घेऊन उबाठा गटाला संपवलं,” असा टोला भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी पत्रकारपरिषदेत लगावला. “उद्धव ठाकरेंना ते (राऊत) मराठी आणि हिंदुत्वापासून दूर घेऊन गेलेत. त्यांनी राज ठाकरेंची सुपारी घेतली आहे का? असा सवाल आहे,” असंही बन म्हणाले.

तसेच पुढे बोलताना, “आक्रमक हिंदुत्ववादी राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंना ते (राऊत) काँग्रेसच्या दावणीला बांधतील का? आधी उबाठा गट काँग्रेसच्या दावणीला बांधला,” असा टोला बन यांनी लगावला. “सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं वाटत नाही. राज ठाकरे भूमिकेवर ठाम आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांचा चेहरा काँग्रेसला पचनी पडणार नाही,” असं स्पष्ट मत बन यांनी नोंदवलं.

हेही वाचा :

सूनेच्या खोलीत 5 दिवस होता बॉयफ्रेंड,नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर…

साप आणि मांजर चक्क उंदरासाठी लढले, आणि पुढे काय झाले…Viral Video

धर्मेंद्र खरच हेमा मालिनींसोबत राहत नाहीत का? बॉबी देओलने प्रकरण स्पष्ट केले…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *