राज्यातील हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोकण-गोवा किनाऱ्यावर वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (dangerous)पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण-पूरव अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ हवेची अस्थिर स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचा प्रभाव कोकण किनारपट्टीसह राज्यातील इतर भागांवरही जाण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात आज सकाळपासून हलक्या सरींनी पावसाची सुरूवात झाली आहे. हवामान खात्याचे अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. रत्नागिरीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी वाहतूक आणि घरगुती सुरक्षा याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरच्या कोल्हार बुद्रुक गावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातही अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तोंडाशी आलेलं भातपिक आणि कापणी केलेल्या शेतीस मोठा धोका निर्माण झाला आहे.
दक्षिण रायगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार (dangerous)पावसाची सुरूवात झाली असून, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने मदत जाहीर केली होती, मात्र काही भागात शेती पूर्णपणे वाहून गेली आहे.हवामान खात्याचे अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यातील किनारपट्टी भागात सतत पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी गरजेपुरते घराबाहेर पडण्याचे टाळावे आणि सतर्क राहावे.
हेही वाचा :
हिरोकडं S*x ची मागणी! अनुभव सांगताना म्हणाला, ‘दिग्दर्शकाने रुममध्ये…
भाजप एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत….
16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्नीसोबत S*X म्हणजे…