राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. (crash) अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती एअरपोर्ट येथे लँडिंगवेळी हा अपघात झाला. अजितदादा प्रायव्हेट विमानातून बारामतीला जात होते. दरम्यान, अपघात होण्यामागचे नेमके कारण काय याबाबत विमान कंपनीने माहिती दिली आहे.

अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्हीएसआर कंपनीचे होते.(crash) या कंपनीने विमान अपघाताबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यांनुसार, विमान पूर्णतः सुरक्षित होते. त्यावर कार्यरत असलेले दोन्ही पायलट अत्यंत अनुभवी आहेत. प्राथमिक माहितीनुसार कमी दृश्यमानतेमुळे विजिबिलिटी कमी असल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय करणार असल्याचेही VSR एविएशनने स्पष्ट केले आहे.

अजित पवार आज सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबई येथून बारामतीकडे रवाना झाले होते. (crash)त्यांच्या विमानाचा ८.४५ च्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजित पवारांसह एकूण ६ जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक असे एकूण ६ जण बारामतीला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातानंतर आता बारामती रुग्णालयाबाहेर खूप गर्दी झाली आहे. अजित दादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा

महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली

Indian Railways: ट्रेनमध्ये दारू बाळगणं कायदेशीर आहे का? बाटली सापडल्यास किती दंड, अटक होणार की नाही—

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *